मला काय हवंय?आत्मवंचना की आत्मपूजा??

जीवनात सुख-दु:ख सारखे येतंच असतात. पण तो एक आभास असतो. कारण, सुख-दु:ख हे एखाद्या घटनेचे पूर्ण  परिणाम आल्यावरच ठरतात. तेही काही स्थिर नसते. पण हे सगळं सांगणं सोपं आहे. खरंच दु:खी आणि निराश मनाच्या स्थितीत काहीच योग्य विचार सुचत नाही. त्यावेळा बहुतेकदा आपल्याकडून आत्मवंचना होते. स्वतःचीच फसवणूक!

त्यावेळी भेकड आणि आत्मवंचना करणारे मूर्ख रडत बसतात. त्याहून जे मूर्ख असतात, आत्महत्या करण्याचा विचार मनात आणतात आणि संघर्ष करण्यासाठी व विजयी होण्यासाठी ईश्वराने दिलेली शक्ती स्वतःची हत्या करण्यासाठी खर्च करतात त्यांना तर काय म्हणावे ? मूर्ख हा शब्द दुखावणारा वाटतो ना? पण खरच निराश अवस्था म्हणजे मूर्खपणाच आहे.

शक्तीशाली स्वतःचा अधिकार स्वतःच घेतात.

काहीच शक्य नाही. दु:खाचा डोंगर कोसळलाय. सगळे रस्ते बंद झालेय. रडू पण शकत नाही अशी स्थिती आहे.कुणाला सांगु? कुठे जाऊ?  अस वाटतंय? भ्रम आहे तो! निव्वळ भ्रम! आत्मवंचना आहे ती!!

परमेश्वराचे नामस्मरण शक्य नाही? प.पू. गुरुदेव काकामहाराज आपल्याला आवडेल त्या देवाचे नाव घ्यायला सांगतात. खरंच सांगा, इतक कठीण आहे का नामस्मरण? आत्महत्येहून तर खूपच सोपं. सिद्धयोग साधना व पूर्वाभ्यास यासंबंधी आधीच्या लेखात विस्ताराने आलंय. शांत बसून थोडा वेळ स्वतः च्या आपोआप होणाऱ्या श्वासोच्छवासावर मन सोडून देणे. शारीरिक क्रियांना पूर्ण स्वातंत्र्य! हे शक्य नाही का? अतिविचाराने अविचार आणि अविवेक होतो. आणि अगदी काही सुचतच नसेल तर थोड शांत पडून राहणं किंवा विश्रांती घेणं शक्य नाही?

एकच लक्षात ठेवायचं, "सगळं शक्य आहे !" ते सगळं शुभ पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मी धीर धरेनम ईश्वरावर विश्वास ठेवेन. तो कधी धोका देणारच नाही.
ऑग मांदिनो (Og Mandino The Greatest Salesman In The World ) नि लिहेलेल्या प्रसिद्ध ताडपत्रात एक सुंदर वाक्य आहे " मी नेहमी एक पाउल उचलेन आणि त्यानंतर अजून एक !" पहा कित्ती सोपं आहे.

कारायचं ते इतकंच,
 "एक पाउल ध्येयाच्या दिशेने! "
                               "एक पाउल यशाच्या दिशेने उचला आणि उचलत रहा!"